*संकटाला घाबरणे हा पुरुषार्थ नाही*
पुरुषार्थ हा प्रत्येका मध्ये असतो तो जागृत करून योग्य पराक्रम गाजवता आला पाहिजे.प्रतिकुल परस्थिती अनुकुल करण्याचं कौशल्य सामर्थ्य स्वतः मध्ये निर्माण करणं म्हणजे पुरुषार्थ जागृत करणं पुरूषार्थ हा आव्हान पेलण्यासाठी स्वीकारण्यासाठी असतो .आव्हान जितकं मोठं पुरुषार्थ तितकाच विशालकाय असतो .आपण स्वीकारलेल आव्हान आपला पुरुषार्थ ठरवत असतो.अनंत संकट अडचणी यावर मात करत पराक्रम निर्माण करणयाचा पुरुषार्थ अर्जित करता आला तर जीवन यशस्वी होत . आयुष्य म्हटलं कि अनेक संकटं,वादळ, समस्या वारंवार नित्य येणार या मध्ये काही दुमत नाही.बदल हा नैसर्गिक आहे कोणतीही एक स्थिती कायम टिकून राहत नाही. आपल्या कडील उपलब्ध ज्ञानाचा ब्रह्मास्त्र म्हणून वापर करता आला पाहिजे . संकटाला उत्तम संधीत परिवर्तित करता येण्याची कला क्षमता , शक्ति सामर्थ्य ताकद म्हणजे यशस्वी जीवन होय .हि क्षमता अर्जित करणं म्हणजे पुरूषार्थ यासाठी आवश्यक ते ज्ञान आपण जीवनाच्या विविध टप्प्यांवर आवश्यकतेनुसार अर्जित केले पाहिजे .विविध संकटं,वादळ, काठीण प्रसंग यांचा संगम हा जीवनात घडुन येणारच पण त्यावर मार्ग काढण्यासाठी आपलं सामर्थ्य आपण सज्ज ठेवल पाहिजे .अखंड संघर्षाची मालिका हिच जीवनाची खरी ओळख असते .मुळात अडचण हिच आहे कि हे सर्व गणित समजलं पाहिजे. संकटाला उत्तम संधीत परिवर्तित करता येण्याची काला म्हणजे पुरूषार्थ म्हणून यशस्वी जीवन म्हणजे फार काही वेगळं नसतं .वेळेवेळी येणारी संकटं संधीत परिवर्तित करता आली पाहिजेत. वास्तविक निसर्ग कडुन आपल्याला घडविण्यासाठीच आपल्या समोर वेगवेगळी संकट अडचणी उभा राहत असतात .परंतु संकट, अडचणी, समस्या, वादळं हि आपल्याला अडविण्यासाठी दुःख देण्यासाठी कधीच आलेली नसताना.आपल्याला दुःखी कमजोर करणे हा निसर्गाचा हेतु कधीच नसतो .पण आपला पुरुषार्थ दुबळा असेल तर आपण याला नकारात्मक स्वीकारतो. म्हणूनच आपण संकट,वादळ , समस्या यांना घाबरतो .दुःखी होतो खचुन जातो .खरी समस्या इथंच आहे .न घाबरता न दुःखी होता न ताण ,तणाव घेता चिंता न करता जीवनातील कोणतंही संकट हे आपल्याला रडविण्यासाठी नाही तर सहाजिकच आपल्याला घडविण्यासाठी आलेलं असतं .हा विचार प्रकट होण म्हणजे आपला पुरुषार्थ जागृत करणं खुप महत्वपूर्ण आहे .संकटाला निसर्गाचे निमंत्रण समजुन ज्यांनी, ज्यांनी आपल्या जीवनात संकटाला उत्तम संधीत परिवर्तित केले. पुरुषार्थ गाजवला ते महामानव होऊन समाजासाठी आदर्श ठरले . आपण छोट्या छोट्या गोष्टी, समस्या, संकटं आल तरी तणाव घेत़ो.कारण पण खुप छोटी छोटी असतात .त्याच वास्तविक मुल्य काहीच नसतं. परंतु आपण ते समजूत घेत नाही. म्हणून गल्लत होते आणि आपल्या जीवनात दुःखाची उत्पत्ती होते. वास्तविक दुःख हे नाहीच मुळी आपल्या मन सारखी घटना घडली अथवा आपल्या मनाला अनुकूल अस घडल तर आपण आनंद समजतो .आणि मनाच्या विरूद्ध घटना घडली किंवा मनाला प्रति कुल अशी घटना घडली कि आपण दुःखी होतो खिन्न होतो तणाव घेतो .पण पुरुषार्थ हे बळ अर्जित करता आलं तर बहु दुःख आपोआप नष्ट होतात. संकटं समस्या अडचण हि प्रत्येकाला आहे आणि येणारच मात्र अडचण समस्या आणि संकट याच स्वरूप व्यक्ति परत्वे वेगळं असतं .परंतु असणार हे निश्चित आहे या मध्ये काही शंका कुशंका नाहीच.आपल्या कडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्ञान साठा किती उपलब्ध आहे. यावरून त्या संकटाचा समाना करण्याची ताकद शक्ती क्षमता निर्माण होणारा पुरुषार्थ निर्धारीत होत असते. म्हणुन संकट मोठं आहे कि छोटं हे आपल्या ज्ञानावर ठरत आणि याला भेदण्याच कार्य पुरुषार्थ करतो . संकटाला निसर्गाचे निमंत्रण समजुन आपल्याकडील ज्ञानाचा ब्रह्मास म्हणून वापर करा . पुरुषार्थ निर्माण करत संकाटाला उत्तम संधीत परिवर्तित करता आलं म्हणजे जीवन यशस्वी झाल. पुरुषार्थ हे सामर्थ्य बळ निर्माण करून जीवन सार्थक करता आलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
9011634301