*जो संयमाची परीक्षा उत्तीर्ण होतो त्याची गुणवत्ता विद्वत्ता फळास येते*
संयमाची पराकाष्ठा यशाचा आरंभ असतो .सृष्टीवर संयमाची परीक्षा हि सर्वात जास्त कठिण परिक्षा असते.संयम कधी ढळेल हे कोणालाही खात्रीशीर सांगता येत नाही.नजर हटताच दुर्घटना घडते तसंच काहीसं संयमाच आहे.संयम संपला कि घटना घडामोड घडण निश्चित असतं. उथळता हि कधीचं आणि कोणत्याही क्षेत्रात लाभदायक नसते .संयम कठिण आहे पण लाभदायक असतो.मान सन्मान अपमान हे नेहमी संयमाची परीक्षा घेत असतात पण जो संयमाची परीक्षा उत्तीर्ण होतो त्याची गुणवत्ता विद्वत्ता फळास येते .विद्वत्ता व गुणवत्ता हि कितीही प्रचंड मोठ्या प्रमाणात असली आणि संयम नसेल तर हि गुणवत्ता विद्वत्ता निरर्थक निरूपयोगी ठरत असते . संयम हे जीवनातील उत्कृष्ट असं बळ असुन ते यशस्वी जीवनाचा पाया आहे .प्रगतीच पहिलं लक्षण संयम आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. मन ,बुद्धी, विचार या मध्ये संयम निर्माण झाला तर आयुष्यात यशोशिखरावर पोहचण्या पासुन आपल्याला कोणतीही शक्ती रोखु शकत नाही.महणुन संयम हे जीवनातील ब्रह्म अस्त्र आहे .त्याचा वापर आपण ज्या पद्धतीने करणार त्या पद्धतीने परीणाम आपल्याला पाहायला मिळणार म्हणून संयम गुणवत्ता आणि विद्वत्ता हा यशोशिखरावर पोहचण्यासाठी राजमार्ग आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. निसर्गाच्या चक्रानुसार पृथ्वीवर जन्मला आलेला प्रत्येक व्यक्ती हा जवळपास सारखाच गुणवान, विद्वान असतो .परंतु आपल्या गुणवत्ता आणि विद्वत्ता आपण कोणत्या कार्यासाठी वापरतो त्यावर त्यावर त्याच महत्व अवलंबून असतं . गुणवत्ता आणि विद्वत्ता याला जर संयमाची जोड आपण देऊ शकलो तर आपलं जीवन यशस्वी उन्नत, प्रगत, आणि नावलौकिक करणार ठरत या मध्ये काहीच संदेह नाही .निसर्गाने पृथ्वीवर अनेक प्रकारचे जीव सजीव निर्माण केले आहेत.त्यापैकी मानव एक सजीव प्राणी असुन निसर्गाने निर्माण केलेली प्रत्येक व्यक्ती जवळपास सारखीच असते थोडाफार अंशतः बदल शरिर रचनेत, चेहरा, उंची या मध्ये अंशतः बदल असु शकतो .फार मोठ्या प्रमाणात फरक अथवा तफावत आढळत नाही. निसर्गाने प्रत्येकाला समान प्रमाणात सर्व शारिरीक बाबी वाटप केल्या आहेत . अपवादाने काही व्यक्तिंना एखाद्या अवयव कमी जास्त प्रमाणात असतो . कुणाला ऐकायला येत नाही .कुणाला दिसत नाही. तसेच कुणाला बोलता येत नाही. त्याच प्रमाणे एखाद्याला एखाद्या अवयव नसेलही पण प्रत्येकाला मेंदू बुद्धी हि सर्वांना सम प्रमाणात निश्चितच दिलेली असुन. मेंदू मधील रचना घटक जवळपास सारखेच आहेत परंतु त्या मेंदू चा वापर आपण ज्या पद्धतीने करतो . त्यानुसार आपली विद्वत्ता ठरतो .आणि विद्वत्ता गुणवत्ता व संयम एकत्र असेल तर यशाचा त्रिवेणी संगम तयार होतो . महणुन प्रत्येक व्यक्ती मध्ये प्रचंड अशी विद्वत्ता आणि गुणवत्ता असते च परंतु सगळ्यात महत्त्वाची बाब हि संयम आहे .आणि हा संयम प्रत्येकाकडे असेल च असे नाही.गुणवत्ता आणि विद्वत्ता प्रचंड असूनही संयमा शिवाय यशाच्या शिखरापर्यंत पोहोचता येत नाही.अनेक विद्वान लोकांची उदाहरणे आहेत विद्वत्ता, आणि गुणवत्ता प्रचंड होती परंतु संयम नसल्याकारणाने त्यांना सुद्धा अपयशाचा सामना करावा लागला .वास्तविक गुणवत्ता विद्वत्ता आणि सयंम हा त्रिवेणी संगम ज्याच्याकडे आहे .तो सदैव यशोशिखरावर असतो. यशा पर्यंत पोहचण्यासाठी फक्त गुणवत्ता आणि विद्वत्ता असुन चालत नाही .तर उच्च पराकोटीचा संयम खुप आवश्यक आहे.विषय कोणत्याही क्षेत्राशी निगडीत असो त्या क्षेत्रात आपलं नावलौकिक करण्यासाठी अथवा आपल अस्तित्व परस्थित करण्यासाठी संयमाची आवश्यकता नितांत आहे . त्याच बरोबर दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या क्षेत्रातील आपला वावर असतो अथवा त्या क्षेत्रात आपल्याला यशस्वी होण्यासाठी आपल मार्गक्रमण चालू असतं जस काला , क्रीडा, संस्कृती, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार स्वयंरोजगार, यापैकी कुठल्याही क्षेत्रात आपल्याला यश संपादन करण्यासाठी अथवा आपलं नावलौकिक करण्याचा आपला मानस असेल तर गुणवत्ता, विद्वत्ता, आणि संयम हा त्रिवेणी संगम अति आवश्यक आहे . ज्याने संयमवार विजय मिळवला त्याच्या साठी जगातील कुठलच यश अशक्य नाही.महणुन गुणवत्ता, विद्वत्ता आणि संयम हा यशाच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी राजमार्ग आहे. दैनंदिन जीवन असो कि यशाच्या वेगवेगळ्या संधी संकल्पना मुर्त स्वरूपा पर्यंत पोहचण्यासाठी अंतिमतः संयम हाच लाभदायक ठरतो.पण हाच संयम जीवनात निर्माण होण्यासाठी आपली जीवनशैली जबाबदार असते .आहार विहार दैनंदिन दिनचर्या यानुरूप संयम निर्माण होत असतो .संयम अवस्था वाढण्यासाठी आध्यत्मिक ज्ञान हा प्रभावी मार्ग आहे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301