गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023
Share
*जीवन विद्या समजली नाही तर मग सगळं निष्फळ ठरत*.
योग्य फल निष्पत्ती होण्यासाठी जीवन विद्या हि समजणं गरजेच आहे.जीवन विद्या हि आत्मज्ञानाशी निगडित असते . आत्मज्ञान अवगवत होणं म्हणजेच जीवन विद्या अर्जित होणं .जगातील सगळ वैभव ऐश्वर्या असताना देखिल अशांती आणि अस्थिरता निर्माण होत असेल तर मग आपल्याकडं जीवन विद्या नाही.एंकदरीत गरीब श्रीमंत कोणीही मग तो असो ज्यांच्या जीवनात अस्थिरता, अशांती आहे त्यांनी जीवन विद्या अर्जित केलेली नाही अथवा त्या मार्गाने मार्गस्थ नाहीत.जीवनाचा मतीत अर्थ समजला पाहिजे .मतीत अर्थ समजला तर जीवन हितार्थ लागत आयुष्याचा सार्थक उदेश सार्थकी लागण्यासाठी अथवा योग्य पद्धतीने आयुष्य पुर्ण करण्यासाठी जे काही ज्ञान तत्वज्ञान कामी पडत उपयोगी ठरत ते ज्ञान , तत्वज्ञान म्हणजे जीवन विद्या. जीवनाला पुर्णतः मिळावी हाच मुख्यत्वे प्रत्येकाचा जीवन हेतु असतो . परंतु आपल्या जन्माचा हेतु आपल्याला महित नसल्या कारणाने आपण जीवना विषयी संभ्रमित असतो .आणि त्यामुळे स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी अनेक अडचणी निर्माण होतात. स्वतःवर नियंत्रण प्रस्थापित करून यशस्वी जीवन मार्ग पुर्ण करण्याची विद्या हि जीवनात शिकावी लागते .आणि हि विद्या कोणत्याही शाळेत विद्यालयात महाविद्यालयात शिकायला मिळतं नाहीतर ती अर्जित करावी लागते . त्यासाठी शिक्षण असलं काय आणि नसल काय तरी चालत.जीवन विद्या समजली तर मग मात्र सगळ शिक्षण उपयोगी ठरत शिक्षण कारणी लागतं. अन्यथा आपण कितीही शिकलो आणि जीवन विद्या समजली नाही तर सगळं शिक्षण व्यर्थ आहे अथवा निरर्थक ठरत.शिक्षण उच्चशिक्षण या पुढे जीवन शिक्षण असतं .ज्याला आपण जीवन विद्या संबोधतो जीवन विद्या अर्जित करण्यासाठी आपण शिक्षित असलच पाहिजे असं नाही.जीवन शिक्षण समजणं हेच जीवनातील हितार्थ आहे.लाखो करोडो रुपये खात्यावर जमा त्याच बरोबर जगातील सगळ्या सुख सुविधा उपलब्ध असणारी माणसं देखिल क्षणात जगाचा निरोप घेतात हे निश्चित भयानक आहे.पण असं का घडतंय ते महत्वाचं आहे.आपण नेमकं काय शिकतोय अथवा काय शिकलो आहेत याचा विचार आपण कधीच करत नाही.शिक्षण कुठेही घ्या फार काही फरक पडत नाही .पण जीवनदायी विद्या समजली पाहिजे. आणि हि विद्या समजली नाही तर मग मात्र सगळ्या घडामोडी प्रयत्न निष्फळ निरर्थक आहेत. जीवनात काय मिळवलं किती मिळवलं या पेक्षाही समाधान कारक रित्या जीवन पुर्ण कसं करता येईल या साठी महत्वाची विद्या जीवन विद्या समजली का ? अथवा अर्जित करता आली का? हेच अंतिमतः महत्वपूर्ण आहे. अन्यथा करोड रूपया सह सर्व सुख सुविधा असणारी व्यक्ती स्वतःला क्षणात संपवुन कशी घेईल .मग असं का ?होत का ?घडत अथवा सगळं काही ऐश्वर्या असणारी माणसं क्षणात नैराश्याच्या गर्तेत सापडतात.अथवा तणाव कमी व्हावा म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या नशेच्या धुंदीत झिंगाट होतात अथवा स्वतःला नशेच गुलाम बनवतात.आपण भौतिक सुख सुविधा ज्या ज्या बाबीना संबोधतो त्या सर्व बाबी असताना देखिल जीवन अशांत अस्थिर असेल तर मग नेमकं कमी काय आहे तर जीवन विद्या कमी पडली नैसर्गिक रित्या या जगाचा निरोप स्वीकारणं अगदी क्रमप्राप्त आहे. त्या मध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही प्रकारची सवलत कोणालाही मिळत नाही त्याची अपेक्षा करण पण गैर आहे पण स्वतःहून या जगाचा निरोप घेण्याच्या दिशेने मार्गक्रमण करण म्हणजे हे शिक्षण मग कोणतं आहे आणि ते हितार्थ आहे का ? तर निश्चितच ते हितार्थ नाही.जीवन उदेश समजला पाहिजे.आपण उगाच काही काम नाही म्हणून जन्म घेतला नाही त्याच प्रयोजन काय आहे हे खुप महत्वाच आहे. जीवनाचं प्रयोजन समजल कि मग जीवन विद्या आपोआप समजते आणि जीवन विद्या समजली कि आपली दृष्टी आणि दृष्टीकोन आपोआप बदलतो.आणि जीवनाविषयी सकारात्मक ऊर्जे निर्माण होऊन वैचारिक प्रगल्भता प्रचंड मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत होते जेणेकरून आपल्या जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होत नाही अथवा तणावाचा प्रवेश होत नाही.जीवन विद्या हेच जीवनातील खर आणि शाश्वत वैभव आहे हे वैभव आपल्याला अर्जित करता आलं पाहिजे.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य*
9011634301
0
Share
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य