Bluepad | Bluepad
Bluepad
सत्य स्वीकारलं तर मन आपोआप हलक होतं
गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
12th Sep, 2023

Share

*सत्य स्वीकारलं तर मन आपोआप हलक होतं*
जीवनातील सुख दुःख निर्मितीच मुख्य केंद्रबिंदू हा मनावी मन‌ आहे.आपल मन आपल्या साई नुसार सत्य असत्य ठरवत पण वास्तविक सत्य काय आहे ते समजलं आणि आपल्या मनाने ते सत्य स्वीकारलं तर मन हलकं होऊन दुःखां चा प्रभाव तात्काळ संपुष्टात येतो .सुख सगळ्यांना हवं असत .पण दुःख कोणालाही नको आहे . नको म्हटलं म्हणून दुःख संपणार नाही अथवा आपल्या जीवनातील दुःखां चा प्रभाव कमी होणार नाही. दुःख संपुष्टात येण्यासाठी अथवा त्याचा प्रभाव कमी होण्यासाठी जीवनात सत्य स्वीकारता आल पाहिजे .जीवन हे क्षणभंगुर आहे हे महित असताना देखील आपण अनंत अपेक्षांचं ओझ घेउन जीवन जगतोय .हा अपेक्षांचा लपंडाव आणि अज्ञान यामुळे जीवनात आपल्याला दुःखा ची जाणीव होते . दुःखांचा भवसिंधु तरूण जाण्यासाठी सत्याची कास धरून सत्य स्वीकारता आलं पाहिजे.दैनंदिन संसारातील अनेक छोट्या मोठ्या दुःखाचा प्रभाव नष्ट करण्यासाठी आपल्याला आपल्या जीवनात वास्तव आणि सत्य याचा योग्य पद्धतीने ताळमेळ घालता आला पाहिजे. परस्थिती बदलता येत नाही पण ती योग्य पद्धतीने स्वीकारून मार्गक्रमण करता येत. शरिर नश्वर असुन आत्मा अमर आहे .या सृष्टीवर आपण पाहुणे आहेत.आपण सोबत काही आणलेलं नाही अथवा कर्माचा चांगला वाईट प्रभाव सोडला तर नगदी स्वरूपात धन, द्रव्य,दारा, पैसा , वगैरे, वगैरे असं काही घेऊन जाणार नाहीत.अंत समयी फक्त काळ हाच आपला सख्खा सोयरा आहे बाकी सगळे नातेवाईक शरीराचे होते .शरीर संपल नाते संपले हे सुर्य प्रकाशा एवढं स्वच्छ आहे .मग आपल्याला शाश्वत काय आहे आणि भौतिक काय आहे या मधील अंतर समजलं पाहिजे. भौतिक मिथ्य आहे तर मग भौतिक मधुन निर्माण होणार दुःख सुद्धा मिथ्य आहे .आपल्या जीवनात निर्माण होणार दुःख हे आपण सत्याचा सामाना करायला घाबरतो म्हणून ओढावत आहे. सत्य स्वीकारता आलं तर सृष्टी वर दुःख अस्तित्वात नाहीच.आपण आपल्या इच्छेनुसार आपल्या मनात जग निर्माण करतो. आणि हेच आपल्या मनातील जग सत्यत उतरतं नाही हे सत्य पाचवता येत नाही म्हणून दुःखाची निर्मीत आणि मालिका सुरू होते .जगातील सगळ्यात कठीण गोष्ट म्हणजे सत्य स्वीकारणं सत्य स्वीकारणं जमलं कि मग असत्य आणि दुःख आपला मागोवा आपोआप सोडतात. परंतु आपल्या मनाने काय स्वीकारायचं आणि काय नाही स्वीकारायचं हे आपल्यावर अवलंबून असतं .परंतु जे आपल्या कडे वर्तमान परिस्थितीत उपलब्ध आहे त्यामध्ये समाधान आनंद मानने म्हणजे सत्य स्वीकारणं होय इच्छा अनंत आहेत अपेक्षा अनंत आहेत पण वास्तवाचं भान असण हे सत्य आहे .आणि सत्य स्वीकारता आलं पाहिजे आपल्याकडे जे उपलब्ध साधन आहेत त्या मध्ये समाधान मानण्याची वृत्ती निर्माण झाली पाहिजे .मग कितीही मोठी घटना घडामोड आपल्या वर काहीही परिणाम करू शकत नाही.
अनेकदा आपल्या मनाला काही वेगळं अपेक्षित असतं आणि उपलब्ध वेगळं असतं मग या मध्ये सुद्धा संतुलन निर्माण करुन आपल्याला योग्य पद्धतीने आपल्या मनाला स्थिरावता आलं पाहिजे .मनाची समजूत घालता आली पाहिजे .सत्य समजवता आलं कि मग मात्र मन दुःख मुक्त होत जीवन हे क्षणभंगुर आहे तरी सुद्धा अपेक्षा इच्छा ह्या अनंत असतात . बहुतांश अपेक्षा पुर्ण होतात तर काही अपेक्षा अपुऱ्या राहतात . आणि जीवनाच्या रंगमंचावर अपेक्षांचा लंपडाव चालू असतो . मग या मधुनच सुख दुःखांची निर्मिती होते . परंतु या सगळ्या मध्ये महत्वाची गोष्ट हि आहे जे उपलब्ध आहे त्या मध्ये समाधान मानण्याची वृत्ती जर निर्माण झाली तर दुःख मुक्त होण्यापासून आपल्यला कोणतीही शक्ती रोखु शकत नाही.कितीही आणि काहीही मिळाल तरी मानवी मन हे असं विचित्र आहे कि ते आपल्याला जे मिळालं त्याबद्दल कधीच समाधानी राहु देत नाही .कारण मानवी मन हे अंत्यत चंचल असतं . आणि ते आपलं हितकारक पण असतं आणि अहितकारक सुद्धा असत .म्हणजे एकंदरीत मानवी मन हे आपल्या सुख दुःखच मुळ असतं त्यामुळे मनाला संभाळन हे आपलं खुप मोठ कौशल्य असत. शेवटी आपल्या सोबत काय आहे काय नाही, आपण काय कमावले काय आहे काय गमावले हे फार महत्त्वाचे नाही कारण निसर्गाच्या नियमानुसार आपल्यला अखत्यारी मध्ये कुठलिही गोष्ट नाही .मग तरी सुद्धा आपण जीवनात घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनाक्रम च्या अनुषंगाने दुःख व्यक्त करतोय . हे कितपत योग्य आहे . सगळ्या बाबी आपल्या मनाला महित असताना सुद्धा आपण जे वास्तविक आणि अंतिम सत्य आपल्याला माहित असताना देखिल आपण ते आपल्या मनाला ते आपण समाजु शकत नाहीत हिच बाबा खुप आश्चर्य कारक आहे . सत्य माहित असताना ते मनाला समजवता न येण हेच खुप अवघड आहे . आणि त्यामुळेच सर्वकाही मिळुन सुद्धा आपण वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने आपण दुःखी होतोच मग त्यासाठी प्रभावी उपाय हाच आहे कि जे आपल्याकडे उपलब्ध आहे त्या मध्ये समाधान मानण्याची वृत्ती निर्माण झाली अथवा हि कला ज्यांना अवगत झाली आहे त्यांना कुठल्याही दुःखाची तीव्रता काहीही परिणाम करू शकत नाही . आणि मनाला सत्य समजवण्याचा सामर्थ्य हे फक्त अध्यात्मिक ज्ञाना मध्ये आहे.महणुन सत्य स्वीकारायला शिका आणि आपण फक्त साक्षीदार आहेत असं साक्षीभावाने जगा दुःख आणि सुख आपल्याला सारखंच दिसेल मग जीवनात दुःख शिल्लक उरेल कुठे आणि कसं म्हणुन अगदी सहज सोपी बाब आहे स्वतःला ज्ञान सदृश्य ठेवा अज्ञान मुक्त व्हा .मन आणि जीवन आपोआप हलक वाटेल.
*गणेश खाडे*
*विचारवंत, साहित्यिक, लेखक, आध्यत्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य* 9011634301

0 

Share


गणेश खाडे  विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य
Written by
गणेश खाडे विचारवंत, साहित्यिक, लेखक अध्यात्मिक मार्गदर्शक तथा संस्थापक अध्यक्ष वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्य

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad