कधीकधी कित्येक गोष्टी आपल्या विरोधात होतं असतात.सर्वकाही सहन होण्याच्या पलीकडे होत असतं.आपण मानसिक-शारीरिकरित्या गळून गेलेलो असतो तेव्हा आपली चिडचिड होणे, अस्वस्थ वाटणे सामान्य आहे अशावेळी मानसिक संतुलन ढळू न देता आपण त्याला कसा प्रतिसाद देतो यावर आपलं मनस्वास्थ्य अवलंबून असतं.अशागोष्टी वेळीच टाळण्यासाठी सकारात्मक स्वसंवाद,ध्यान,मनाचे संस्कार खूप मदतपूर्ण ठरतात.