आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने शब्दांचीच शास्त्रे यत्न करु !
मयुरी रंजना लक्ष्मण.
4th Aug, 2022
Share
एकदा मुखातुन वाणी बाहेर पडली की पडली ती पुन्हा मागे घेता येत नाही त्यामुळे बोलताना प्रत्येकाने विचारपुर्वक बोलणे गरजेचे आहे.प्रत्येक वाक्यात काही शब्द गौण तर काही शब्द प्रधान असतात मग ते कधी आणि कुठे वापरायचे हे ज्याचे त्याने ठरवायचे असते.बाकी,कधी एखाद्या शब्द मुखातुन असा बाणा सारखा तीर देऊन सुटतो की सरळ समोरच्या हृदयाचा घाव घेतो आणि करुन ठेवतो मोठी जखम! मग कदाचीत ही जखम भरुन काढायला असतातही दुसरे मलपट्टी करणारे शब्द परंतु प्रत्येक वेळी जखम भरुन निघेलच अस नाही.त्यामुळे बाण सोडतानाच विचारपुर्वक सोडला तर! आपण शब्दाने जगही जंकू शकतो तर कधी जिंकलेल जग गमावूनही बसु शकतो .त्यामूळे आपल्याकडे आसणा-या शब्दसपंदेच्या संप्पतीचा काटेकोरपणे वापर करायला हवा...!