मनाला भुरळ पाडणारी पुष्पसृष्टी....
उन्हाळा म्हटले कि सगळ्या डोक्यातील विचार म्हणजे ऊन ऊन ऊन आणि फक्त ऊनचं डोक्यात असतं. उकाड्याने येणार घाम घरात पायचं थांबत नसतात . कंटाळुन कंटाळुन बरेच जण झोपतात. उकाड्याने झोपही येत नसते म्हणून नुसता त्रागा होणे,राग राग होणे,... मनस्थिती बिघडणे स्थुल आळशीपणा मनात घर करुन लागता त्यात मग जाडीचे प्रमान वाढते. मग अजुन टेंशन....अशी कारणे लोकांना नकळत एक दररोजची सवय बनुन जाते.
पण.. उन्हाळ्यातही टेंशन विना, आनंदी... कसे राहीच ते जाणुन घेऊयात.........
उन्हाळा म्हणजे झाडांखाली बसुन निसर्गरम्य परिसराचा आनंद घेत गप्पगोष्टी करणे,चंपुल्या,दगडे,क्यरम खेळणे होय. तर.. सांगण्याच मुद्दा हा कि एकाचं दृष्टीने विचार मते मांडणे. चुकीचे आहे...मनात एकदा वाईट विचारांनी घर केलं कि फक्त वाईट वाईट अन् वाईटच दिसते. म्हणुन एखाद्यावर रागवले तर समोरच्याच्याही मनाप्रमाणे एकदा विचार करावा. म्हणजे सांगण्याच उद्देश प्रत्येकच गोष्टीत दोन्ही बाजूने विचार करावा.
निसरम्य दृष्य पाहीची असतील तर..झाडे लावा झाडे जगवा हि युक्ती अवलंबने अत्यंत गरजेचं आहे हं..!
उन्हाळ्यातली ती सकाळ काय भारी वाटते नाही मन ताजेतवाने करते. दुपार म्हणजे निर्सगाचे सान्निध्यात रमणे. उन्हाळ्यातही बरणार्या रिमझीम धारा नि अधीन नाही अनुभवलेला मातीच वास..ऊन असतानाही येणारा वारा ऊन भासवतच नाही हो..!
उन्हाळ्यात हळुहळू बदलणारे दृष्य अगदी मनाला भुरळ पाडते. सांयकाळची निरव शांतता नि तो मंद मंद वाहणारा वारा चमचम चमकणारे चांदणे चद्रप्रकाळ किती भारी वाटते ना..!
काम करुन थकल्यावर दुपारची झाडाखाली गार गार गाड्यावाले काकांनकडुन मुलांच्या हट्टापाई कुल्फी घेणे नंतर वामकुक्षी नि पुन्हा तेवढ्याच जोमाने काम करणारे शेतकरी.. शेतकरी खरे जगतात ते निसर्गाच्या सान्निध्यातचं !!