तू म्हणतेस माझी
आठवण येत नाही
मग विचार ना एकदा
तुझ्या डोळ्यातून
वाहणाऱ्या अश्रूना
कोणासाठी वाहतात ?
गळतात तुझ्या डोळ्यातून
पण पाणी येते माझ्या डोळ्यातून
अगं वेडे हे प्रेम नाही तर काय आहे?
कुठून तरी एक लहर येते
आठवणींच्या पावसाची
चिंब भिजून जातो ग
तुझ्या चाहुलीचा आवाज येतो ना
तेव्हा तू समोर नाही दिसली की,
मग एकटाच ग खूप रडतो तुझ्यासाठी ...!
....✍️ कवयित्री अनुश्री
अनिता आबनावे ©®